President Message

नमो बुद्धाय जय भीम.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारत देशाचा इतिहास बौद्ध व ब्राम्हणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे तसेच सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. बौद्धांची या देशात कधीच राजकीय क्रांती होऊ नये म्हणून बौद्धांच्या सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या सर्व चळवळी संपविण्यात आल्या, बौद्धांचे सामाजिक व धार्मिक क्रांतीचे प्रतिक संपविले किवा त्यात बदल केले, त्यामुळे बौद्ध समाज हा मुख्य उद्देशापासून आपल्याला  दूर जाताना दिसत आहे. आपल्याला आपला गौरवशाली इतिहास सांगावा लागेल, आपल्याला महापुरुषांच्या आंदोलनाला गतिमान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागेल. आपण सर्व बौद्ध अनुयायी आमची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न कराल हीच प्रामाणिक अपेक्षा ....